पु.ल. देशपांडे यांचे विचार
जुन्यात आपण रंगतो... स्मृतीची पाने उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दु:खाच्या!” - पु.ल. देशपांडे
शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच. - पु.ल. देशपांडे
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे - पु.ल. देशपांडे
परिस्थिति हा अश्रूंचा कारखाना आहे!. - पु.ल. देशपांडे
माणसाचे “केस गेलेले” असले तरी चालतील…. पण…. माणुस हा “गेलेली केस” असु नये…… - पु.ल. देशपांडे
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते. - पु.ल. देशपांडे
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे… - पु.ल. देशपांडे
आयुष्य फार सुंदर आहे… ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे… - पु.ल. देशपांडे
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो. - पु.ल. देशपांडे
प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो. - पु.ल. देशपांडे
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते. - पु.ल. देशपांडे
बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण. - पु.ल. देशपांडे
खरं तर सगळे कागद सारखेच… त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते. - पु.ल. देशपांडे
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो. - पु.ल. देशपांडे
आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे. - पु.ल. देशपांडे
सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही - पु.ल. देशपांडे
कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे. - पु.ल. देशपांडे
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं. - पु.ल. देशपांडे
आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय. ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते. - पु.ल. देशपांडे
